आज २८ नोव्हेंबर महात्मा फुल्यांचा आज स्मृतीदीन.महात्मा फुलेंचे कार्य काय आहे हे सर्वांनाच माहित आहे.नावापुढे महात्मा लावुन कुणी महात्मा होत नसतं.त्यासाठी फुलेंच्यासारखं कार्य असावं लागतं.अत्यंत प्रतीकुल परिस्थीतीत पुण्यासारख्या शहरात लोकजागृतीचं व समाजसुधाराचं कार्य करणं ही सोपी गोष्ट नव्हती.लोकजागृती व समाजसुधार करताना तथाकथीत उच्चवर्णियांकडुन होणारा छळ,अवहेलना ही त्यांच्याच नाही तर सावित्रीमायच्या पण वाटेला आली.समाजकार्य करत असताना ते समाजकार्य आपल्या घरातुनच सुरवात करावी ह्यासाठी फुल्यांनी सावित्रीमाय फुलेंना शिकवले व स्त्रीशिक्षण व समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा दीली.ज्यावेळी बहुजनांचे शाळेत जाणे कुणी स्वप्नातही पाहिले नसेल त्यावेळी फुल्यांनी बहुजनांसाठी शाळा सुरु केल्या.
स्त्रीयांची देशातली बिकट स्थिती पाहुन फुल्यांनी स्त्रिशिक्षणावर भर तर दिलाच पण बालविवाहास विरोध तर विधवाविवाहास उत्तेजन दिले.पुण्यातल्या धर्ममार्तंडानी महात्मा फुले व सावित्रीमायला खुप छळले तरीही समाज जागृतीचे कार्य फुल्यांनी सोडले नाही.भारतातील पहिले स्त्री उध्दारकर्ते फुले दांपत्यच होय.स्त्रियांचे शिक्षण व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा फुले अविरत लढले.
भारतातील शेतकरी व कामगार लोकांची हालाखीची परिस्थीती ह्याला जबाबदार कोण आहे हे फुल्यांनी ओळखले होते.शेतकऱ्यांचा आसुडमधुन त्यांनी त्याविषयी भुमिका घेतली होती.समाजातील गोरगरीबांबद्दल कळवळा असणारे फुले हे भारतातील पहिलेच समाजसुधारक म्हणायला हवेत.रयतेचा राजा शिवाजी यांची समाधी शोधुन काढुन शिवजयंती सुरु करणारा पहिला शिवरायप्रेमी महात्मा फुलेच होते.अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे पहिले बहुजन महात्मा फुलेच होते.ब्राम्हणवादावर कडाडुन टिका करणारे फुलेच होते.देवदेवतांचे अवडंबर माजवुन बहुजनांना गुलाम करणाऱ्या ब्राम्हणवाद्यांच्या विरोधात आवाज उठवणारे क्रांतीबा फुलेच होते.अनिष्ट चालिरीती व प्रथा मोडण्यासाठी बहुजनांना उत्तेजन देणारे क्रांतीबा फुलेच होते.
आजच्या दिवशी त्यांच्या कार्याचा उदोउदो करणारे लोक इतरवेळी त्यांची शिकवण कशी विसरतात हेच कळत नाही.स्त्रीशिक्षण सरकारने मोफत जरी केले असले तरी समाजातील स्त्रियांची जी स्थिती आहे त्याला आपणच जबाबदार नाही आहोत का?रोज स्त्रियांचा छळ होतो,बलात्कार होतात,हुंड्यासाठी स्त्रियांना मारले जाते व आत्महत्या होतात यासाठी जबाबदार कोण असतं?समाजच ना.महात्मा फुलेंना मुलबाळ नव्हते.सावित्रीमाई फुले एकदा फुलेंना म्हणाल्या की "मला मुलबाळ होत नाही तर तुम्ही दुसरे लग्न करा.सवत घेवुन या.दुसऱ्याबाईकडुन तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल".यावर फुले म्हणतात की "जर दोष तुझ्यात नसुन माझ्यात असेल तर?त्यापेक्षा तुच दुसरे लग्न कर व मला सवत्या घेवुन ये".यावर सावित्रीमाईना फुलेंचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे कळुन आले.त्यांना जरी अपत्य नसले तरी फुल्यांनी ब्राम्हण समाजातील विधवेच्या पोटचे मुल दत्तक घेतले.
अशा या महान समाजसुधारकाचा आज स्मृतीदीन.त्यांच्या स्मृतीस जर खरोखर अभिवादन करायचे असेल तर प्रत्येकाने समाजकार्याच करावे अथवा घराच्या बाहेर पडावे असेही नाही.तुम्ही तुमचे विचार शुध्द ठेवा.मुलांमध्ये मुलगा व मुलगी असा भेद करु नका.ज्या संधी आपण मुलासाठी देतो त्या मुलींसाठीही द्या.बायकोचा व आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिका.समाजातील स्त्रियांबद्दल आदरभाव ठेवा.बोलताना कोणत्याहा स्त्रीबाबत अवहेलना अथवा तिरस्कार करु नका.देवदेवतांमुळे तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाहीतर देवळातील भटाच्या पोटांपाण्याचा प्रश्व सुटतो हे ओळखा.अनिष्ट प्रथा व परंपरा पाळु नका.हे केलात तरच महात्मा फुलेंचे खरे अभिवादन केलात हे सिध्द होईल.आजच्या दिवशी माझा बाप व माझ्या गुरुंचे गुरु क्रांतीबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन
Comments
Post a Comment